Saturday, May 11, 2024

आई



 

जगातल्या जवळ-जवळ प्रत्येक भाषेत आईसाठी जे शब्द आहेत, त्यातचा उच्चार असतोच.  मदर, मा, माद्रे, अम्मा, ममी इत्यादी. आपण मात्र आई म्हणतो. आत्मा आणि ईश्वराचा संगम म्हणजे आई, असे कोणीतरी मागे सांगितले. खरे खोटे कोणास ठाऊक, पण आई बरोबर असलेली नाळ काही तुटत नाही. मार्च महिन्यात आई असाध्य कर्करोगाशी तीन वर्षे झुंज देत गेली.२९ मार्च २०२१ रोजी तिच्या कर्करोगाचे निदान झाले. रोग फारच पुढच्या टप्प्यात पोचलेला, त्यामुळे पोटात पाणी भरलेले. तिचे वय, तिची अंगकाठी आणि पसरलेला रोग, त्यामुळे शस्त्रक्रिया शक्य नव्हती. डॉक्टरांनी तेंव्हाच सहा महिन्यांपेक्षा अधिक आयुष्य यांच्याकडे नाही, असा निवाडा दिला. पण आईने त्या रोगाला वाकुल्या दाखवत, डॉक्टरांचा निवाडा खोटा ठरवत तीन वर्षे रोगाला झुंज देत, बरोबर २९ मार्च २०२४ रोजी अखेरचा श्वास घेतला.

 

या तीन वर्षांत ती पलंगाला खिळून आहे असे फक्त सुरुवातीचे तीन महिने आणि हे शेवटचे दोन महिने, एरवी उरलेले अडीच वर्षे ती व्यवस्थित राहिली. दरवेळेस केमोथेरपी देतांना नर्सेस विचारायच्या, “आजींना काही त्रास? बी.पी. शुगर, किंवा आणखीन काही? कधी कुठले ऑपरेशन झालेय?” सगळ्याचे उत्तर नकारात्मक! कारण आईला कोणताच त्रास नव्हता. आईची जिद्द, तिची इच्छाशक्ती आणि रोगाला मात देऊ शकू या विश्वासाने तिने तीन वर्षे काढली. कधीही तिला विचारलं, ‘कशी आहेस?’ ‘व्यवस्थित आहे मी. काही होत नाहीये मला.’ हे तिचे पेटंट उत्तर! शेवटी मात्र रोगाने तिला संपूर्ण ग्रासले, वैद्यकीय शास्त्राने आधीच हात टेकले होते, आता तिच्या शरीराने देखील हात टेकले आणि मग इच्छाशक्ती देखील संपली. मृत्यू असतोच, पण आईने ही लढाई जिंकली असे म्हणायला काहीच हरकत नाही. हा लढाऊ बाणा मात्र सुरुवातीपासूनच असावा.

 

त्याकाळी लहान असलेल्या अमरावती शहरातून लग्न होऊन आई मुंबईला आली आणि मुंबईचीच झाली. कधी कधी तिचे अनुभव सांगायची; तिची पहिली पाणीपुरी, पहिल्यांदा खाल्लेला डोसा, पहिल्यांदाच पाहिलेला समुद्र. एका मोठ्या कुटुंबातून लग्न होऊन ती मुंबईच्या चाळीत रहायला आली, तेंव्हा तिला किती adjustments करायला लागल्या असतील कोणास ठाऊक? माहेर लोकांनी आणि धार्मिक संस्कारांनी आणि कर्म-कांडांनी भरलेलं, आणि इथे दोघेच दोघे, त्यात डॅडींची देव-धर्माच्या बाबतीत अनास्था! पण स्वतःहून अनेक नवीन गोष्टी शिकत, मैत्री करत आणि लोकांना आपलेसे करत, तिने फार मोठा गोतावळा जमा करून ठेवला. अरुणा-मावशी-आई-काकी-आणि शेवटी आजी, या प्रवासात तिने खूप माणसे जोडली. अगदी केमोथेरपीच्या हॉस्पिटल मधल्या नर्सेस आणि डॉक्टरांशी पण ऐसपैस गप्पा मारायची. दरवेळेस नर्सेसना, ‘पुढच्या वेळेस तुमच्या साठी काय आणू?” असे विचारायची आणि त्या देखील हक्काने लाडू, चिवडा अश्या फर्माईशी करायच्या.पुढच्या वेळेला संपूर्ण स्टाफ साठी स्वतः केलेले लाडू घेऊन आई हजर!

 

आईला स्वयंपाक करण्याची आणि लोकांना खाऊ घालण्याची भयंकर हौस. सुगरण तर होतीच आणि हाताला चव. तिने केलेल्या साध्या भाज्यांची देखील लोक तारीफ करत. त्याचबरोबर नवीन पदार्थ शिकण्याची देखील हौस. अमेरिकेवरून जेंव्हा ती परतली, तेंव्हा पिझ्झाची रेसिपी लिहून आणली होती आणि इथे करून खाऊ घातला होता. ओवन वगैरे नव्हता, पण तिचे स्वतःचे लॉजिक आणि डोके वापरून तिने तव्यावरचा पिझ्झा खाऊ घातला होता! नातवडांना एकदा टीव्ही वरचे पाहून बार्बेक्यू खायचे होते, तेंव्हा हिने लोकरीच्या सुयांना भाज्या लावून, गॅस वरच शेकून त्यांना तृप्त केले. कोणत्याही कारणासाठी अडून रहायचे नाही, हार मानायची नाही, ही जिद्द, जी शेवटपर्यंत होती.  डॅडींचे, आमचे, आमच्या मुलांचे मित्र मैत्रिणी, तिच्या मैत्रिणी, तिचे विद्यार्थी, सगळ्यांच्या जिभेवर आजही तिच्या पदार्थांची चव रेंगाळतेय. एवढी सगळ्यांना हौसेने खाऊ घालणारी आई, शेवटच्या पंधरा दिवसांत मात्र अन्नाचा एक कणही खाऊ शकली नाही.

 




प्रत्येकाला आपलंसं करून घेण्यात तिची हातोटी, मग तिच्याहून वयाने, शिक्षणाने मोठी माणसे असोत किंवा तिची नातवंडे आणि त्यांचा मित्र परिवार असो, तिची सगळ्यांशी मैत्री. प्रत्येकाला तिचा आधार. मोठ्यांबरोबर त्यांच्या विषयावर गप्पा मारणे, लहान मुलांना गोष्टी सांगणे, त्यांच्या बरोबर गाणी म्हणणे, खेळणे, हे तिला खूप आवडत असे.महागडी खेळणी काय करायचीत लहान मुलांना?” असे म्हणून घरातलीच भांडी त्यांना खेळायला द्यायची. मुलेही आनंदात खेळायची.

 

डॅडींच्या नावाचे वलय मोठे, त्यांचे मित्र पण त्याच तोडीचे, पण आईवर कधीच या गोष्टीचे दडपण नव्हते. सगळ्यांशी गप्पा मारत त्यांना विविध पदार्थ खाऊ घालत ती त्यांच्याशी मैत्रीचे नाते तयार करत असे. डॅडींचा देव, कर्म-कांड वगैरे वर अजिबात विश्वास नव्हता, आणि आईची मात्र रोज पूजा, पोथी नियमित सुरु असायचे. डॅडींनी कधी तिला विरोध केला नाही, किंवा तिनेही कधी डॅडींना भरीस घातले नाही. या दोघांचे अनेक विचार न जुळणारे असून देखील जवळ-जवळ ५० वर्षे त्यांनी संसार केला. हल्लीच्या युगात ज्याला तरुण मंडळीआमची स्पेस हवीअसे म्हणतात ना, तीस्पेसया दोघांनी एकमेकांना न मागता किंवा त्याचे अवडंबर न माजवता दिली होती. भांडणे, वाद होत नसत असे अजिबात नाही! आई स्वतःचे मत, तिचे विचार सांगायला, खरे तर ठासून सांगायला ती अजिबात कमी करत नसे.

 

डॅडी तिच्याबरोबर न कंटाळता तिच्या मराठी मालिका पहात असत आणि आई देखील, जर डॅडींनी एखादा लेख, पुस्तक किंवा एखादी बातमी वाचायला सांगितली तर आई हमखास वाचून काढत असे आणि आवडले नाही तर ते देखील सांगत असे. तिची स्वतःची अशी राजकीय मते होती आणि त्याबद्दल डॅडींशी वाद घालायला देखील ती कमी करत नसे. डॅडींची नोकरी, फिरती, येण्याजाण्याच्या विचित्र वेळा, त्यांचा अबोल स्वभाव सगळेच तिच्या अंगवळणी पडले होते आणि त्याविषयी तिची कधीच तक्रार नसे. आमची आत्त्या घरी आली, की हीच कधीतरी म्हणायची, ‘अहो दोघे बहिण भाऊ गप्पा मारा की जरा, काय त्या पुस्तकांत नाक खुपसून बसला आहात!तिचे मात्र सगळ्यांशी गुळपीठ. इथून कधी फोन केला आणि खूप वेळ जर एंगेज लागला, तर समजायचे की आई कोणत्यातरी काकू, आत्त्या, मावशी मामी, किंवा एखाद्या मैत्रिणीशी बोलतेय!

 

कोणाला एखाद्या पदार्थाची रेसिपी सांग, एखाद्याला आयुर्वेदिक औषधच सांग असे तिचे कायम सुरु असे. लोकांना मदत करण्यात तिला अतीव आनंद होत असे. कोणी आजारी असले तर हमखास धावून जायची आई. माझे लग्न तेंव्हा नुकतेच ठरले होते आणि मझ्या सासूचे पायाचे ऑपरेशन झाले. आई त्यांच्या मदतीला मुंबईहून उठून कलकत्त्याला गेली होती. धड ओळख न पाळख. माझे सासर संपूर्ण मांसाहारी, ती पक्की शाकाहारी, तरी गेली आणि १५-२० दिवस तिथे राहून त्यांची सेवा करून आली. मावशीचे यजमान अपघातात अचानक गेले, तेंव्हा वर्षभर बहिणीला एकटे वाटू नये म्हणून दर पंधरा दिवसांनी ती औरंगाबादला जाऊन तिच्या बरोबर रहात असे. घरी काम करणाऱ्या बायका, कॉलनीचे वॉचमन किंवा माळी सगळ्यांना कोणत्याना कोणत्या तरी पद्धतीने तिने आपणहून मदत केली आहे. हे तिला कोणी सांगत नसे, तिची ती वृत्तीच होती आणि डॅडींचा तिला पूर्ण पाठींबा असे. लग्न लवकर झाले, म्हणून शिक्षण अधर्वट राहिले होते. ते लग्नानंतर पूर्ण तर केलेच, पण त्या नंतरही स्वस्थ नाही बसली. ती शास्त्रीय गायन शिकली. कुठे टेक्स्टाईल डिझायनिंगचा कोर्स कर, तर कुठे लायब्ररी सायन्सचा कोर्स तर कधी हस्तकला आणि शेवटी योगाभ्यासाचा कोर्स. स्वस्थ कधीच बसली नाही ती. समाज कार्याच्या आवडीने स्त्री-मुक्ती संघटनेत पुष्कळ वर्षे कार्यरत होती. संधी मिळाली असती तर कदाचित इंजिनियर डॉक्टर झाली असती ती! आम्ही लहान असतांना काहीही बिघडले की ही त्याला दुरुस्त करायला तयार. एकदा घरातला ट्रांझिस्टर बिघडला. ही बसली तो दुरुस्त करायला.झाला तर झाला नाही तर दुकानात देऊ,” पण त्याची गरजच पडली नाही आणि तो पुशे ३-४ वर्ष तरी मस्त चालला!! हाताला चव आणि हातात कला. तिने काढलेली रांगोळी पुसाविशीच वाटत नसे. या, आणि अश्या अनेक गोष्टी तिच्याकडून शिकायच्या राहूनच गेल्या. आई आहेच आणि ती असणारच हा जो विचार असतो, तो किती फोल ठरतो हे २९ मार्चला कळले.

 

नोकरीच्या अनेक संधी चालून आल्या असून सुद्धा आईने नोकरी का नाही केली हे एक कोडेच आहे. पण आम्हां दोघी बहिणींना शेजारच्या तरुण मुलींना ती नेहमीच त्यासाठी प्रोत्साहन देत आली. माझा भाचा तर आजी जवळच मोठा झाला. मला देखील, कधी कामानिमित्त कुठे जायचे असल्यास, आई माझ्या लेकीला सांभाळायला माझ्या घरी हजर. शेजार-पाजारच्या तरुण मुली नोकरीवर जात, त्यांची मुले आमच्याकडेच रहात.तू जा, मी सांभाळते मुलांना, त्यांची काळजी नको करूस”, असे त्या मुलींना ती सांगे. त्यांना सांभाळणे, म्हणजे ती त्यांना लळाच लावत असे. तिला ना कधी दागिन्यांची हौस होती न कधी नवीन साड्यांची. स्वतःसाठी तर नक्कीच नाही. मात्र काहीतरी नवीन शिकण्याची मात्र हौस मात्र कमी झाली नाही,

 

अगदी शेवटपर्यंत तिने योगाभ्यासाचे वर्ग घेतले. शिकायला खूप विद्यार्थी होते, मुले मुली, मध्यमवयीन, म्हातारे आणि विवध थरातले लोक. आधीतर फी घ्यायची नाही असेच तिने ठरवले होते, पण आम्ही भरीस पाडले म्हणून १०० रुपयांच्या फी पासून सुरु करून स्वाती ५०० रुपये महिना, अशी फी ती घेत असे. केमोथेरपी घेऊन आली की त्यादिवासाचा क्लास बंद, मग २-३ दिवसांनी परत सुरु. बरे नसतांना देखील तिने स्वतःचे असे रुटीन तयार करून ठेवले होते. आई फेसबुक आणि whatsapp वर बरीच active होती. कोणाचा फोटो किंवा चांगले काही लिहून आले की लगेच हिची कमेंट असे. बरीचटेक सॅवीहोती. रोज वर्तमानपत्रातले शब्दकोडे सोडवणे हा तिचा छंद. एकदा तिच्या मैत्रिणीने, गांगल मावशीने विचारले, शब्द अडला की काय करतेस गं? आई म्हणाली मी गुगल करते!! आता राहून राहून असे वाटते, की तिच्या विचारांची संगतीच लागत नाही. देवा-धर्माचे पालन करणारी, पोथी पुराणाचे पठण करणारी, शेगावला दर महिन्याला जाऊन दर्शन घेणारी, पंढरपूरची वारी करणारी आई, जायच्या आगोदर निक्षून सांगून गेली, माझे दहन करा, पण अस्थी विसर्जन, श्राद्ध वगैरे काही घालायचे नाही. माझ्या मुलीला देखील, लग्न वगैरे सगळं नंतर, आगोदर PhD करून शिक्षण पूर्ण कर, असा सल्ला द्यायची! 

 

आई गेली की माहेर संपते. लग्न झाल्या नंतर आईकडे, माहेरी गेले, की कसे अश्वसात्मक वाटत असे. काही चिंता नाही, काळजी नाही … आई आहेच हा विश्वास. बहिणाबाईंनी किती छान सांगितले आहे, “ माझ माहेर माहेर, सदा गाणे तुझ्या ओठी, मग माहेरून आली सासरले कशासाठी?” त्याला सासुरवाशीण उत्तर देते:अरे लागले डोहाये, सांगे शेतातली माटी, गाते माहेराच गाणं, लेक येईल रे पोटी. देरे देरे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी, माय सासरी नांदते! देव कुठे देव कुठे, भरीसनी जो उरला,अरे उरीसुनी माझ्या, माहेरात सामावला!असं माहेर, आता घर आहे, पण आई नाही त्यामुळे माहेर नाही. घरी दहा बारा लोक जेवायला आले, की आईलाच विचारायचे, ‘आई भातासाठी किती तांदूळ घेऊ, किंवा किती भाजी लागेल?’ किंवा अनेकदा करूनही पुरणपोळी करायच्या आधी, आईला विचारलच पाहिजे, काय किती घेऊ, त्याचे प्रमाण काय? आई गेली आणि  हे माहेरपण पण संपले. एकदम मोठे झाल्यासारखे वाटू लागते. आईशी अनेक बातीत पटायचे नाही, वादही व्हयचे पण परत काही अडले, काही आनंदाची बातमी असली, की आधी तिलाच सांगायचे असायचे. 

 

अशी आमची आई. जिद्दी आणि थोडोशी हट्टी देखील, पण माया लावणारी. माणसे जोडणारी, सगळ्यांना मोठेपणाच्या पंखाखाली घेणारी, प्रत्येक कार्य निर्वेध पार पाडणारी, साधी गृहिणी, अनेकांचा आधारस्तंभ, अरुणा साधू. तिच्या आठवणींना हा उजाळा. 



  

 

Thursday, May 26, 2022

समाधान

 

 

हसण्याचं वय नसतं

लहान मोठी गुपिते ऐकून

खिदळण्याचंही वय नसतं

 

शिकण्याचं वय नसतं

चुकत-माकत पडत-उठत

पुढे जाण्याचंही वय नसतं

 

शिकण्याचं खरच वय नसतं

आजी-आई, मित्र -भाऊ

अगदी नातवंडांकडूनही ते घडत असतं.

 

फिरण्याचं वय नसतं

सौंदर्याचा आस्वाद घेत 

बागडण्याचं वय नसतं

 

नटण्याचं वय नसतं

जुने-नवीन “ट्रेंड्स फॉलो” करीत

मुरडण्याचंही वय नसतं.

 

बोलण्याचं वय नसतं

खरं-खोटं बोचरं-लाघवी

मनातलं सांगायचं वय नसतं

 

मैत्रीचं वय नसतं

कधी कुठे कसे धागे जुळतील

त्या स्नेहाचं वय नसतं

 

गमतीचं वय नसतं

मित्र-सोबती, गप्पागोष्टी

धम्माल करण्याचं वय नसतं

 

गाण्याचंही वय नसतं

धुंद-मंद संगीतात

न्हाऊन निघायचं वय नसतं.

 

स्वातंत्र्याचं वय नसतं

चिंता, मत्सर लोभ क्रोध

यातून मुक्त होण्याचं वय नसतं

 

घाबरण्याचं वय नसतं

प्रेम, जीवन, आजार मृत्यू

याचं भय असून नसतं

 

आनंदाचं वय नसतं

प्रत्येक क्षणांत लपलेल्या त्या

आमोदाच वय नसतं

 

तृप्ततेचं वय नसतं

वादळात सापडलेल्या होडीला

अलगद तीरावर पोचवण्यात समाधान असत.

 

Wednesday, January 13, 2021

आठवणीचे साम्राज्य!


मकर संक्रांत 

"तीळ - गुळ घ्या आणि गोड गोड बोला," मकर संक्रांत म्हंटल की मराठी माणूस हमखास हे वाक्य म्हणतो. लहान मोठ्यांना नमस्कार करतात आणि मोठे आशीर्वादापर तीळ-गुळ हातात ठेवतात. 

आज मकर संक्रांत. एरवी तारखा बदलणारे आपले सण, मकर संक्ररांत मात्र तारीख बदलत नाही. दरवर्षी जानेवारीच्या १४ तारखेला येणारा हा सण, वेगळीच गंमत करून जायचा. 

लहान असतांना, एव्हाना थंडीचा जोर कमी होत चाललेला असायचा आणि उन्हाचा ताप वाढत जायचा. अर्थात , मुंबईची थंडी म्हणजे फक्त पहाटे थोडीशी आणि रात्री थोडीशी. पण त्याच्यात सुद्धा आम्ही कधी कधी स्वेटर घालून शाळेला जायचो, रात्री दुलई किंवा blanket घेऊन झोपायचो... पंखा मात्र फिरत राहिला पाहिजे!

तर अश्या थंडीत येणारी ही मकर संक्रांत. मकर संक्रांत म्हणजे नक्की काय, ह्याची फारशी माहिती नव्हतीच. आमच्या साठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आईने केलेल्या तीळ-गुळाच्या पोळ्या, लाडू, हळदी कुंकू आणि तिळगुळ देता-घेतांना म्हंटलेलं, "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला,". आमच्आया घरी संपूर्ईण तिळाचे लाडू क्वचितच व्हायचे. आई नेहमीच तीळ कुटाचे लाडू करायची. मग आम्ही आईच्या मागे लागायचो, पूर्ण तीळाचे लाडू हवेत म्हणून. मग ते तसे एक ७-८ लाडू, विकत आणायचे.

संक्रांतीच्या आधी काही दिवस आई आणि तिच्या मैत्रिणींचे संवाद कानी पडत, " या वर्षी काय लुटणार?" किंवा "यावर्षी काय वाण देणार गं?" असे प्रश्न! आई बरोबर वेग-वेगळ्या घरी हळदी कुंकवाला जाणे आणि ती सुगडी गोळा करणे, मला फार आवडत असे. त्या सुगाड्यांमध्ये थंडीचा मेवा असायचा. बोरं, गाजराचे तुकडे, उसाची लहान कांडे, हरभरा आणि अर्थातच तीळगुळ. काही बायका अति उत्साही, त्या तीळाचा हलवा करायच्या, वेगवेगळे रंग टाकून! हल्ली हा हलवा कोणी घरी करत असेल असं वाटत नाही. कोणी रुमाल वाटायच्या, कोणी चमचे, तर कोणी साबण अश्या अनेक वस्तू. त्यात एक मजा असायची.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शाळेतलं हळदी कुंकू. प्रत्येक वर्ग एक तारीख ठरवायचा. चार आणे - आठ आणे, अशी वर्गणी गोळा व्हायची. मग प्रत्येक शिक्षिकेला आमंत्रण दिलं जायचं. त्याच्या साठी हळद कुंकू, शेवंतीची फुले आणि तीळगुळ हे आणून ठेवायचं. पूर्ण वर्ग त्या दिवशी स्वच्छं करायचा आणि फळ्यावर स्वागतपर काहीतरी लिहिलेलं असायचं. सगळ्या शिक्षिका येऊन गेल्या कि मग आम्ही उरलेल्या तीळगुळावर ताव मारायला मोकळे! त्यात भांडणेही व्हायची, वर्गणी कशी संपली इथ पासून ते तीळगुळ आम्हाल नाही मिळालं इथ पर्यंत. पण त्यात एक मजा असायची! "गोड गोड बोला" कुठल्या कुठे विरून जायचं!

संक्रांतीच्या आधीपासूनच बाजारात पतंगांची विक्री सुरु असायची. आजच्या दिवशी पतंग उडवायची, आणि पेच पण लढवायचे. कोणी किती पतंग गोळा केल्या ह्याची पण चढा-ओढ असायची. दुसरी मजेदार गोष्ट म्हणजे हलव्याचे दागिने. महाराष्ट्र सोडून दुसरीकडे कुठेही असं सोहळा मी पाहिलेला नाही. असेलही कदाचित, वेगळ्या पद्धतीने. महाराष्ट्रात मात्र नवीन लग्न झालेल्या मुलींना आणि काही ठिकाणी मुलांना पण, काळे कपडे घालतात. सुंदर काळ्या रंगांच्या साड्यांची मागणी असते ह्या दिवसांत. हलव्याचे दागिने म्हणजे, अगदी डोक्याच्या बिंदी पासून ते कंबर पट्टा, बांगड्या मंगळसूत्र ते अगदी जोडवी सुद्धा असतात! जसं नव्या जोडप्याचे कौतुक होतं, तसाच वर्षाच्या आतल्या मुलांचे पण होतं. त्याला बोर न्हाण म्हणतात. लहान लहान मुलांना काळे कपडे आणि हलव्याचे दागिने घालुन्घाळून त्यांच्या डोक्यावरून हिवाळी मेवा ओतला जातो, आणि जमलेल्या लहान मुलांनी तो गोळा करायचा! 

अश्या अनेक छोट्या मोठ्या आठवणी संक्रांत घेऊन आली! आदल्या दिवशीची भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरीची मजा औरच असे!

थोडी मोठी झाल्यावर एक गोष्ट लक्षात आली, हाच एक सण आहे जो दरवर्षी १४ जानेवारीला येतो. दसरा दिवाळी होळी ह्यांच्या तारखा कधीच एक नसतात, असं का? हाच सण पूर्ण भारतभर साजरा केला जातो. गुजरात मध्ये उत्तरायण, पंजाब मध्ये लोहडी, तामिळनाडू मध्ये पोंगल आणि आसाम मध्ये बीहू, असा वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो.

तर गम्मत अशी आहे कि हा आहे सूर्याचा सण. म्हणजे मकरसंक्रांतीला सूर्य देवाचं महत्व आहे. आपले बाकी सगळे सण हे चंद्र पंचांग, अर्थात चंद्राच्या कलांवर अवलंबून असतात. मकर संक्रांतीच्या दिवशी, सूर्य मकर राशी प्रवेश करतो. सहा महिने दक्षिणायानात परिक्रमा करत असलेला सूर्य आता उत्तरायणात शिरतो. दिवस हळू हळू मोठे व्हायला लागतात आणि रात्री लहान. हा दिवस सूर्याचा, म्हणजेच सुर्य पंचांगाचा. आणि म्हणूनच हा सण तारखेप्रमाणे साजरा होतो. मात्र माझे आजोबा सांगायचे, त्यांच्या लहानपणी मकर संक्रांत १३ जानेवारीला होत असे. त्याचं कारण, सौर पंचांगानुसार, परिक्रमा करत असतांना, सूर्य ठराविक ठिकाणी दरवर्षी २० मिनिटे उशिरा पोचतो. म्हणजेच प्रत्येक ७२ वर्षानंतर सूर्याचा उत्तरायणात शिरण्याचा दिवस एका दिवसाने वाढतो.

असं हा सूर्याचा खेळ! आपल्या पूर्वजांनी देखील किती संशोधन करून हे ठरवलं असेल नाही? ह्या विज्ञानातल्या, भौतिक शास्त्राच्या खेळला त्यांनी धर्माची, देवांची जोड लावली आणि हा दिवस आपण विसरू नये ह्याची खात्री करून ठेवली! थंडीत शरीरात calories जास्त जायला हव्यात म्हणून गुळ आणि तीळ खाणे आवश्यक करून ठेवलं, हुशार होते आपले पूर्वज!

Gregorian Calendar , म्हणजे हल्ली आपण जे पाळतो, त्याच्यातला हा पहिला महिना आणि हा आपला पहिला सण, खूप काही आठवणी घेऊन आला. अनेक जुने शब्दही त्या निमित्ताने आठवले, सुगडी, उसाची कांड, वाण... बहुदा ही शब्द संपत्ती टिकवण्यासाठीच कदाचित म्हणत असतील, "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला!"  





Thursday, August 6, 2020

साठा उत्तराची कहाणी

 

अरे काय करतो आहेस नुसता बसून,

मन नाही भरलं कारे अजूनही

स्वतःचं कौतुक बघून?

 

नाही गं, पाहतोय तिला,

पाण्यातून वाट काढणारी बाई

डोक्यावरच्या टोपलीतल्या मुलाला सांभाळत नेणारी आई

 

तिथे पावसात अडकली आहे ती Ambulance

आतला रुग्ण आणि डॉक्टर दोघेही हवालदिल,

पण करणार काय? गाडीला पुढे सरकायला मिळतच नाहीये हिरवा कंदील

 

त्या तिथे झालाय बॉम्बस्फोट

लोकांचा जीव घेण्यासाठी?

तूच सांग, कोणाला मारून कधी मिळते का मुक्ती?

 

विषाणूच्या संसर्गाने लोक झालेत त्राही त्राही

अन्न वस्त्र निवारा

कित्येकांकडे काहीच नाही

 

तरी ह्यांच्या इच्छा संपत नाहीत

जे आहे तेवढ्यात

सुख अजिबात मानत नाहीत.


एवढ्या धुमाळीत करतात

लहान मुलींवर बलात्कार, बायकोला मारतात जाळतात

कसा धजावतो गं ह्यांचा हात?

 

नद्या म्हणे जीवन दायी, पण मग ठेवत का नाहीत साफ सफाई?

नाला करून टाकलाय सगळ्या नद्यांना

मग ती गोदावरी शरयू असो कि गंगा यमुना

 

अरे असा किती त्रागा करशील?

तू सुद्धा होतासच कि माणूस,

जश्या तू चुका केल्यास, तश्याच त्यांच्याही हातून घडतील

 

थोडा वेळ बाहेर फिरून ये,

मोकळ्या हवेत बर वाटेल,

तुमच्या गप्पांचा अड्डा नाही का आज? थोडी मनः शांती मिळेल

 

भेटलो होतो कि परवाच सगळे,

आले होते अल्ला आणि god देखील.

सगळ्यांनीच उडवली टर माझी, म्हणे लवकरच मह्गड्या घरात रहायला जाशील

 

अल्ला ही होता वैतागलेला,

God ने तर हातच टेकले,

काय होतंय नाकातोंडला फडका बांधायला, ह्यांना कोण जाणार समजवायला, म्हणाले

 

कशाला करताय वारी,

कशाला जाता मक्का मदिना आणि रोमला?

भिनलोत आम्ही तुमच्या प्रत्येक कणाकणात, कितींदा पाहिजे म्हणे सांगायला?

 

पूर्ण पृथ्वी वर

केवळ ह्यांच्या कडेच आहे विचार करण्याची शक्ती,

पण त्यांतून त्यांनी जन्माला घातलीये नको असलेली ही आंधळी भक्ती

 

निसर्गाच्या बरोबरीने रहा

हाच निर्णय खरा

पण ह्यांना निसर्ग देखील पाहिजे मुठीत, म्हणे ही आमचीच धरा

 

म्हातारीच्या खुलभर दुधाने

भरला राजाच्या शिवालयाचा गाभारा,

ही कहाणी सांगून सांगून, मीच झालोय म्हातारा.

 

माझ्याही हातून चुका घडल्या,

आहे मला कबूल,

पण माझी हीच गोष्ट माणसात उतरावी, ही खरी दिशाभूल

 

कसा राहू मी त्या घरात

जेंव्हा विस्कटलय माझ्या लेकरांच जीवन

अन्न नाही, शाळा नाहीत, उपचारांसाठी इस्पितळ नाही, कसा करू हे सहन?

 

ह्या गोष्टीने का झालंय

विचलित तुझं चित्त?

असं समाज, तुझ्या चुकांचं हेच आहे प्रायश्चित्त

 

नको गं सीते असा श्राप देऊस

मग घे अवतार धरतीवर पुन्हा पुन्हा

आणि शिकवं त्यांना खऱ्या गोष्टी, रामा रघुनंदना

 

मी तर जाईन गं वेळोवेळी

पण भीती वाटतेय फार

स्वीकारतील का हे लोक माझा हा २.० अवतार?

 

त्यांचे विचार बदललेत

त्यांच्या गरजा बदलल्या.

अरे पण तो शेवटी माणूसच आहे, आपलीच लेकरं हे तू कसे विसरलास.

 

मी ही येते, जाऊया परत एकदा

देऊया ज्ञानाचे काही धडे

आपल्याला आगोदरच सुचायला हवं होत हे

 

सुरु केली प्रयाणाची तयारी दोघांनी

वनवास संपेल? होती का त्यांच्या इच्छा पूर्ण?

ही साठा उत्तराची कहाणी, नेहमी साठीच अपूर्ण


Wednesday, June 10, 2020

ME & COVID-19 (#gocoronago)

These days instead of a work schedule, I start my day by planning which part of the house needs to be disinfected. Corona seems to have taken over all my senses I am feeling lethargic (what else can you feel while working from home but also having to do house work!) ; I am so paranoid,  I keep count of my sneezes and coughs; and then I try to  remind myself to wash my hands constantly. But nothing just nothing seems to be enough. 

The virus has affected people around me as well. I wake up thinking it is my birthday daily because my hubby sings  happy birthday while washing his hands in full volume, and I have anyway lost count of dates and months, said one of my friends. One of my colleagues boasted that his 14-month-old was learning the alphabets quickly because their whole family sings ABCD while washing hands!   There is trauma too. Another colleague is a bit worried as her baby starts crying if her husband comes without the mask. 

Covid has also become a matter of neighbourhood gossip.  When the lady who lives upstairs sneezed a few times last evening, all the neighbours came knocking at her door (equipped with masks and gloves etc., of course). -  Tadke me mirchi thodi zyada hogayi,my neighbour consoled them (fried a few extra chillies in the oil by mistake), which resulted in a collective. ohhhh. Whether that oh was a sigh of relief or an expression of disappointment, is still a question to me! Which lane has how many patients and who is allowing the maid, who can be a silent carrier; are the gossips passed on the chat groups.

When the lockdown first started, we would watch the news regularly. But the news got irritating when channels started displaying the number of infected, discharged and the dead individuals as if they were displaying an IPL scoreboard. Things became worse, when a month later there was a different score board that of migrant workers walking home from sprawling the cities. I became increasingly disgusted as these figures became stepping stones for politicians. 

After much ado about clapping, candle-burning, and flower- showering, the frontline workers are still overwhelmed, and India is still confused. Is subscribing to the newspaper safe? Can I walk my pet? How many hours does the virus stay on various surfaces? And most importantly, when do I need to get tested, and will I get a bed in the hospital if things become dire?? There is no clarity, and everyone seems to be following their own rule-book. Some are washing everything with soap, others are soaking all their fresh produce in salt water, and then there are some who are keeping all the items away for 12 to 18 hours. People are using camphor and turmeric as immunity boosters; propagating that certain teas help you boost immunity; and then some geniuses are, using AND consuming bleach, yeeks (WTF!!) 

The emergence of Covid19 has led to mass hysteria. Whatsapp chats are filled with memes and advisories about a terrible 2020.  And people are ready to curse the astrologers who predicted a great year! India has now also given this virus, the status of a demigod.  In eastern parts of India, many have started calling the virus “Corona Maai, and are praying for her to go away and leave humanity in peace.  

The pandemic has also been compounded by anti-China sentiments.  Many have been asking me not to use cash or cards as they can carry the virus. Instead, you should use Paytm you know, it is contactless;but and in the same breath they continue, also refrain from using Chinese products. Boycott Chinese products. What? Why? If I am not to use Chinese products, my phone will be the first to go, followed by the Paytm app, and the medicines, and the masks!

But the lockdown also has a brighter side. The utensils become cleaner without using too much soap, and a small bottle of floor- cleaner lasts a month. Losing weight is automatic. Now, I can fit into my old blouses and trousers! The air outside is much more breathable than it was 2 -3 months ago as well. And although we have been working from home, my house seems much more organized.  The lockdown has also helped me realize that my husband is capable of washing dishes, doing laundry, and cooking very well!

No one can see the end of this Covid-19 tunnel yet. Until then, let's do our bit for the needy, and help each other survive as we make history.  Chanting Go Corona Go, is not going to save us. 

 


Friday, June 5, 2020

I CAN'T BREATHE

#Ican’tbreathe

 

Once again, the United States of America has bagged the world’s attention for “not so good” reason. Since becoming a Covid-19 hotspot, the US has had the highest numbers of deaths around the globe. But these days the world is looking at the US in shock and dismay for a different reason—.  Shocked by the killing of George Floyd, an African – American man who was suffocated to death, and dismayed, at the leadership that is unable to understand the repercussions from this incident. Nearly 50 years ago, the US had protested and demanded equal rights under the leadership of Martin Luther King Jr., with a “dream”. 50 years later, they have returned to square one.

The sudden demonstrations in the US are not only against the right of equality being taken away, but also the systemic denial of the right to live as a normal human being. While the US is not new to these incidents, many have turned a blind eye against these events, type-casting them as trivial incidents. There is more to this sudden outburst.  It is stemming from people’s frustration; about injustice such as racism, and unequal rights, as well as other issues like economic depression created by Covid19, and environmental degradation.

Six or seven months ago, Indians also demonstrated against injustice. When the Indian government declared plans to implement the CAA & NRC. People came together to demonstrate peacefully and express their dissent. But the similarities don’t end here. We have also had multiple cases of lynching in India. Here, people are being lynched for their religion or their caste. But unlike the US, we should not trivialize these incidents. Indians by and large, are tolerant people. Indians have always waited for a Mahatma Gandhi or a Babasaheb Ambedkar. Do we always have to wait for an emphatic leadership to wake us up from our slumbers, and remind us of our democratic and constitutional rights? For how long must we do this?

Bigotry takes place when superiority overpowers humanity. Arrogance and prejudice of “me” gives way to atrocity. The world has become a much smaller place today so let us not divide but stay together. Everyone needs the other. You need a neighbour. Loneliness is awful.

Let us not grow immune and turn a blind eye towards the happenings around us. Let us remember all the victims of the system — Nirbhaya and many other girls like her; Pehlu Khan and many other minorities like him; Mukesh Vaniya and many other Dalits like him; Rajkumari and many other migrant workers who died walking, on their way home in these Covid times. They all must have said, “I can’t breathe”. 

 

 


Tuesday, May 26, 2020

Unanswered questions on a scorching hot day.

This happened say some 3-4 years back and I am still grappling for answers to the questions this small incident made me ask myself. The incident, a very trivial in a sense, gave me a plethora of questions, answers to which seem farther... 

It happened so...

While driving through the traffic on Delhi roads, on this really warm day, I was fretting about the A/C not working fine. May be the German car air-conditioner cannot cater to the above 40 degree Celsius temperature of Delhi, to cool the interiors. On the roads, as Delhi is always, full of people, sweltering in the heat and still going about with their regular chores. Selling, bargaining, buying and begging.

There are many water sellers and ice lolly sellers on the roads doing brisk business in this heat. The car stopped at one of the signals. "too long of a signal", complained my driver, glancing at the seconds quickly counting down. Suddenly saw a lady... may be a girl, wearing a saree, her head covered with the "pallu" at the red light, tagging her child by hand and another one in her arms. Must be a young mother of about 22 years with 2 kids already in tow, and don't know how many more in the house. 

Watching the ice lollies, the elder one's eyes glowed! What better can anything be other than these lollies in this scorching heat... his eyes said. He tugged at his mother's saree and pointed towards the seller. For a moment... just for a second may be, the child in the mother also came up... Her eyes too gave away the same thoughts as of her son. But it was just a flicker of a second, and then she just dragged her son past the lolly seller.

That moment, I wanted to get down from the car and buy the ice lollies for those three kids, yes three of them and give them a moment of happiness. But I could not. Many thoughts came running, "will she take it from me", "would she approve of this gesture," "what if she refuses"... and with a sudden honk from the car behind, I was brought back from my thoughts. The driver had already started the engine and had driven past the mother and her children. 

I kept on thinking, what held me back from getting off the car and giving them a surprise? Definitely not finances. Was it the young mother's pride or her determination or understanding of her finances? Or was it was my ego; what if she refused? Though I wanted to do it, I had already termed myself "generous" and a refusal would have busted that false balloon. I was afraid, about my reaction and dejection, if at all a refusal had come.  And what if she had accepted it? The joy on their faces, would have given me Joy? Or a story for me to tell all, about how I just did some good gesture? 

I was confused and still am.

It is difficult! Difficult to do something selflessly, to not to think about it or boast about it, but just to feel good about it. I did not have the courage, nor did I have the belief in my own self. If only I had, the story would be different for sure. This would have been a really small gesture... nothing big.

It is only one in thousands and crores, who can become a Baba or Prakash Amte or Mother Teresa... no wonder!